Image by OakleyOriginals via Flickr
कारण...
रोज सूर्योदय होतो , तो एक परिवर्तन घेऊन
रोज सूर्यास्त होतो , तो एक इतिहास पचवून
बाल्यावस्था ते युवावस्था , युवावस्था ते वृद्धावस्था
हा परिणाम साध्य होतो परिवर्तनानेच
प्राचिनतेतून आधुनिकता, तंत्र-तंत्रात आधुनिकता
हा परिणाम साध्य होतो परिवर्तनानेच
ब्रह्मांडात असे काय ते महामृत्युंजय
परंतु परिवर्तन काय ते अजेय
दु:खातून सुखाकडे , अश्रुतून स्मिताकडे
प्रकाशतून तमाकडे अन् तमातून प्रकाशाकडे
हा ही परिणाम साध्य झाला तो परिवर्तनानेच
उद्धार असो संसाराचा अथवा पतन
कितीही करा तुम्ही जतन
अहो...
अहो..परिवर्तनच करेल त्याचं कर्तन .
म्हणून ...
या विश्वात एकच आणि एकच गोष्ट आहे चिरंतन,
परिवर्तन , परिवर्तन ! परिवर्तन !!
........................................चंद्रकांत साव
काय सांगता ... लिखान आवडले?
मग आम्हाला अभिप्राय लिहा , मित्रांना हे लिखान पाठवा किंवा ट्विटला पाठवा !तुमच्या सुचना - अभिप्राय
तुम्ही तुमच्या ई-मेल वरही हे लिखान मागवु शकता.
![Reblog this post [with Zemanta]](http://img.zemanta.com/reblog_e.png?x-id=6d280dc4-e354-4686-a96f-a39f5f10e417)




0 comments:
Post a Comment