तुझी आठवण येते तेव्हा..

TearsTears (Photo credit: TimOve)तुझी आठवण येते तेव्हा..
देवा एकाच मागणी
तिची पापणी भरू दे
माझ्या नावाचा एक तरी थेंब
तिच्या नयनी तरु दे..

रात अशी ही तंद्रित
पापणिहि बघ लवते आहे
ह्रुदयाचे ठोके हळुवार सांगे
कुणीतरी माझ्यासाठी जागत आहे
तुझी आठवण येते तेव्हा
तु दिलेली प्रेमपत्रे वाचत बसतो
तु येणार नाहीस माहित असतं
डोळे पुसुन मग स्वतःवरच हसतो..

एकही क्षण नाही जेव्हा
तिची आठवण येत नसेल,
असा एकतरी क्षण असेल
जेव्हा ती मला आठवत असेल
तू समोर असतेस
तेंव्हा बोलू देत नाहीस
तू समोर नसतेस
तेंव्हा झोपू देत नाहीस

तो ढग बघ कसा
बरसण्यासाठी आतुरलाय
तुझ्या चिंब गालावरुन ओघळला
म्हणुन थेंबसुद्धा आनंदलाय
माझ्या शब्दांना अजुन तरी
काहीच अर्थ नाही.

जोपर्यंत त्या गीताला
तुझ्या ओठांचा स्पर्श नाही.
येणारा दिवस कधीच
तुझ्या आठवणीशिवाय जात नाही
दिवस जरी गेला तरी
तुझी आठवण जात नाही.

आज सारे विसरली तू
नावही न येई ओठांवर.....
कसे मानू तू कधी
खरे प्रेम करशील कुणावर......
तेव्हा सागर किनारी साक्षीने
तू घेतल्यास किती शपथा.....
किती मारल्यास मिठया तू
तो चंद्र ढगात लपता........
नजरेत जरी अश्रू असले
तरी ओठावर हास्य असाव
ओठावरच्या हास्यामागे
नजरेतल्या अश्रूना लपवाव.

कसे करू माफ़ तुला
जे घाव तू मला दिले......
घेऊन माझी फूले
तू काटेच मला दिले......
डोळे पुसण्यास माझे
पाऊस धावूनी आला,
थेंब कोणता तुझा नि माझा
हेच कळेना म्हणाला.

आज पुन्हा तुझी आठवण आली
आणि मी उगीच हसु लागलो
खोटं खोटं हसताना...
कळलेच नाही, कधी रडु लागलो...

तुझ्या नि माझ्या वाटा,
एकमेकींशी नेहमीच समांतर
एकत्रच चालतात खर तर,
पण मिटत नाही अंतर
मनातला प्रत्येक क्षण
ओठांवरती येईल का?
ओठांवरील प्रत्येक शब्द
मनातच राहील का?

ई-मेल फॉरवर्ड - आभार - लेखक/ कवी

टिप्पण्या

  1. अरे व्वा.... स्वागत स्वागत :)

    एक वर्षाने कविता पोस्ट झालीय ;)

    उत्तर द्याहटवा
  2. तुझ्या नि माझ्या वाटा,
    एकमेकींशी नेहमीच समांतर
    एकत्रच चालतात खर तर,
    पण मिटत नाही अंतर

    खूप सुंदर...........

    उत्तर द्याहटवा
  3. माणूस कोणावर एवढे प्रेम का करतो
    आपण ज्याच्यावर एवढे प्रेम करतो
    त्याला ह्या भावना कळतात का.
    ही कविता एवढी हळवी आहे
    की लिहिणारा किती मनस्वी माणूस
    असेल ह्याची कल्पना येते.
    खर सांगू का आत्ताचे जग खूप
    व्यवहारी आहे. येथे कोणी कोणासाठी
    थांबत नाही.
    व्यक्त केलेल्या भावना समजून घ्यायाला ही
    येते कोणाला वेळ नाही.
    आज काल कोणावर एवधे प्रेम करण्याचे दिवस
    राहिले नाहीत.
    तुमच्यासाठी झुरणारी कोणी व्यक्ती जर आजच्या
    जगात असेल तर तुम्ही स्वतःला खरोखर
    भाग्यवान समजा.
    मी तुम्हाला मनापासून सांगू इच्छितो
    की त्या विरळ भाग्यवान लोकांपैकी एक
    आहे.कारण एक वेडा दुसऱ्या वेड्याला समजू शकतो.

    उत्तर द्याहटवा
  4. तुझी आठवण येते तेव्हा..
    देवा एकाच मागणी
    तिची पापणी भरू दे
    माझ्या नावाचा एक तरी थेंब
    तिच्या नयनी तरु दे.

    उत्तर द्याहटवा
  5. very nice .....pan kharach samorchyala aplya bhavana kalat nahi ani to samjun pan ghet aahe

    उत्तर द्याहटवा
  6. khup chan....karach kon swatachya swatha sathi dusarya mansala evdha visarto ki tyala tyachya ashruchi pan kimmat rahat nahi

    उत्तर द्याहटवा
  7. kharach khup chan kavita ahe manatil ghalmel tumhi evadya sundar shabdat badhist keli ahe ki varnan mi tari karu shakat nahi.

    Haridas Jadhav

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा