मैत्री [Maitree - Friendship - Marathi Poem]

FriendsImage via Wikipediaमैत्री केली आहेस म्हणुन तुला सांगावस वाटतय...
गरज म्हणून 'नातं ' कधी जोडू नकोस
सोय म्हणून सहज असं तोडू नकोस..

रक्ताचं नाही म्हणून, कवडीमोल ठरवू नकोस
भावनांचं मोल जाण..मोठेपणात हरवू नकोस..

आयुष्याच्या प्रत्येक वळणात नवं नातं जुळत असतं
जन्मभर पुरेल इतकं भरून प्रेम मिळत असतं..

तुझी ओंजळ पुढे कर, कमीपणा मानू नकोस
व्यवहारातलं देणं घेणं फक्तं मध्ये आणू नकोस..

मिळेल तितकं घेत रहा, जमेल तितकं देत रहा
दिलं घेतलं सरेल तेव्हा.. पुन्हा मागून घेत रहा..

समाधानात तडजोड असते...फक्त जरा समजून घे
'नातं ' म्हणजे ओझं नाही, मनापासून उमजून घे..

विश्वासाचे चार शब्दं..दुसरं काही देऊ नकोस
जाणीवपूर्वक 'नातं ' जप , मध्येच माघार घेऊ नकोस...!

.................................. मनोज जाधव
Reblog this post [with Zemanta]

टिप्पण्या

  1. फार छान कविता आहेत. मला फार आवडल्या.

    उत्तर द्याहटवा
  2. प्रिया : कविता मना सारक्या आहेत मला अतिशय आवडल्या.

    उत्तर द्याहटवा
  3. Hey hi!!!!
    dis is Sushil kelkar
    I luv u'r poems it's very very nice and fantastic
    great creation guys,
    keep it up n giv us more n more fantastic poems to read.

    उत्तर द्याहटवा
  4. ajache nate na te rahile changlya dudhache virjan zale but ur poem simply great.

    उत्तर द्याहटवा
  5. I liKE ThiS Poem...
    Nice Yaar
    Mangesh Sawant

    उत्तर द्याहटवा
  6. mast kavita ahe mala mana pasun avdli...........

    उत्तर द्याहटवा
  7. very nice manoj.... i ke dis poem very much... khupch surekh...

    उत्तर द्याहटवा
  8. samrat devghare
    व्‍यसन फॅशन वासना तरुनामधे वाढत आहे,
    यामुळेच क्रांतीकारी विचार तरुनामधले मेलेले आहे.
    भगतसिंग राजगुरु संभाजींची याला काय हो कदर,
    आजचा तरुन स्‍वतासहित रक्‍ताच्‍या नात्‍यालाही विसरलेला आहे. आजचा तरुन पाहुन भंगतसिंगाना वाटत असेल मि,
    विनाकारन फासावर गेलो,
    मि सुध्‍दा एैश्‍वर्य सपंन्‍न जिवन जगलो असतो फालतुच देहाने मेलो.
    त्‍या औरंगजेबाची संस्‍कृती निट पन हिन्‍दु संस्‍कृती लयास गेली आहे,
    छावा संभाजीलाही वाटत असेल. विनकारण मी तळफळत मेलो आहे.
    युवा सुधारनेसाठी अजुनही कुणी खंबीर पुढे नाही आहे.
    युवा संघटनेच्‍या नावाखाली सारेच राजकारन खेलत आहे.
    तरुन आजचा भ्रष्‍ट झाला तर लवकरच देश भस्‍म्‍ा होनार आहे.
    काय या तरुनांना बी. घडवनारा असा कुनी उरलेला आहे.
    -सम्राट देवघरे पळसमंडळ

    उत्तर द्याहटवा
  9. KAVITA EKDAM MAST AHET MALA AWADLY THANKS

    उत्तर द्याहटवा
  10. ब्लॉग प्रशासकाने ही टिप्पण्णी हटविली आहे.

    उत्तर द्याहटवा
  11. ब्लॉग प्रशासकाने ही टिप्पण्णी हटविली आहे.

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा